गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:28 IST

जयकुमार रावल: नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना

शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योजक बनावं असं आवाहन करत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी २९ सप्टेंबरला राज्यभरात एक हजार ठिकाणी होणाऱ्या रोजगार महाकुंभात सुमारे २०० बाजार समित्यांना सहभागी करून घेतलं आहे.

जयकुमार रावल: नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

कृषी उत्पन्न बाजार समिती म्हटलं की आतापर्यंत डोळ्यासमोर एकच चित्र यायचं, शेतमालाची आवक, लिलाव आणि विक्री. या बाजार समित्यांचं काम शेतकऱ्यांचा माल विकत घेणं आणि त्याचा व्यवहार करणं इथवरच मर्यादित मानलं जायचं. पण आता या बाजार समित्यांना रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेची नवी दिशा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतः रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावं, असं आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे.

२९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात एकाच दिवशी आणि एकाच वेळी १ हजार ठिकाणी 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ' आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात राज्यातील सुमारे २०० कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी होणार आहेत. युवकांना रोजगार, व्यवसाय आणि कौशल्यविकासाच्या संधी मिळाव्यात, यासाठी बाजार समिती स्तरावर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर जयकुमार रावल यांनी बाजार समित्यांच्या सभापतींची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बाजार समित्यांना स्पष्ट सांगितलं की, त्यांनी केवळ शेतमालाच्या व्यवहारापुरतं मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम करावं. म्हणजे बाजार समितीची भूमिका आता शेतमाल विकत घेणं आणि विकणं इथवर मर्यादित राहणार नाही, तर स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करणं हीदेखील त्यांची जबाबदारी असणार आहे.

शेतमालावर प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, ग्रेडिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि निर्यात अशा अनेक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो, असं रावल यांनी स्पष्ट केलं. ट्रक ड्रायव्हिंगपासून ते आधुनिक लॉजिस्टिक्स आणि अन्नप्रक्रिया उद्योगापर्यंत युवकांना विविध कौशल्याधारित संधी उपलब्ध करून देता येतील, असंही त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्राचा शेतमाल फक्त राज्यातील बाजारपेठेपुरता मर्यादित न राहता देशभर आणि पुढे जगातील प्रमुख शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मजबूत व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचं रावल यांनी सांगितलं. यासाठी प्रक्रिया, योग्य साठवणूक, वाहतूक, आकर्षक पॅकेजिंग आणि ब्रँडिंग यांची सांगड घालावी लागेल, असं त्यांनी अधोरेखित केलं.

रोजगार महाकुंभासाठी बाजार समित्यांनी आवश्यक त्या ठिकाणी स्टॉल उभारावेत, विविध उद्योग आणि रोजगारदात्यांना यात सहभागी करून घ्यावं, कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि रोजगाराच्या संधींची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करावी, अशा सूचना रावल यांनी बाजार समित्यांना दिल्या.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही या उपक्रमासाठी बाजार समित्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन केलं. बाजार समिती म्हणजे केवळ मालविक्रीचं ठिकाण नसून रोजगार, व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचं मोठं केंद्र बनू शकतं, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ