गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:35 IST

'बिग बॉस'मध्ये स्क्रिप्टशिवाय स्पर्धकांचा खरा चेहरा कसा समोर येतो?

'बिग बॉस' सीझन २०च्या भव्य प्रीमियरनंतर शोच्या यशामागचे गुपित समोर आले आहे - कोणतीही स्क्रिप्ट नाही, रीटेक नाही, फक्त कॅमेऱ्यांसमोरचे खरेखुरे क्षण.

'बिग बॉस'मध्ये स्क्रिप्टशिवाय स्पर्धकांचा खरा चेहरा कसा समोर येतो? छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

एंडेमोल शाइन इंडिया आणि बनिजे एंटरटेनमेंटचा भाग असलेली प्रोडक्शन कंपनी भारतातील आघाडीच्या एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊसपैकी एक मानली जाते. टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर सातत्याने ब्लॉकबस्टर स्क्रिप्टेड आणि नॉन-स्क्रिप्टेड कंटेंट देणाऱ्या याच हाऊसने रिअॅलिटी एंटरटेनमेंटमधील आपली परंपरा पुढे नेत भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित रिअॅलिटी शोंपैकी एक असलेला 'बिग बॉस' पुन्हा प्रेक्षकांसमोर आणला आहे.

या शोचं होस्टिंग पुन्हा एकदा बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानकडे आलं आहे. शोच्या ऐतिहासिक २०व्या सीझनला ६ सप्टेंबर रोजी भव्य प्रीमियरने सुरुवात झाली.

इतर अनेक टेलिव्हिजन फॉरमॅट शोंमध्ये निकाल आधीच ठरलेल्या कथानकानुसार किंवा संपादकीय निर्णयांतून समोर येतात. 'बिग बॉस'ची खरी ताकद मात्र पूर्णपणे प्रेक्षकांच्या हातात असते. या शोमध्ये विजेता कोण होणार, हे पूर्णपणे प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष मतदानावर ठरतं. सोशल मीडियावर निष्पक्षतेवरून वेळोवेळी चर्चा आणि वाद रंगत असले, तरी शो एका कठोर ऑडियन्स व्होटिंग सिस्टमखाली चालतो, ज्याद्वारे प्रत्येक एलिमिनेशन आणि शेवटी विजेत्याचा निर्णय होतो.

गेल्या दोन दशकांत 'बिग बॉस'चा विस्तार सहा भाषांमध्ये झाला आहे. देशातील वेगवेगळ्या भागांतील आघाडीचे सुपरस्टार्स वेळोवेळी या शोचे होस्ट राहिले असून शोने संपूर्ण देशभरात मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. मात्र या शोची खरी ताकद फक्त प्रस्थापित कलाकारांना व्यासपीठ देण्यात नाही, तर नवे स्टार्स घडवण्यातही आहे. 'बिग बॉस'चं घर हे असं व्यासपीठ आहे, जिथे अनोळखी चेहरे आत जातात आणि बाहेर पडताना घराघरात ओळखलं जाणारं नाव बनतात. शहनाज गिल आणि फरहाना भट्ट यांसारख्या माजी स्पर्धकांनी कोणत्याही मोठ्या फॅन बेसशिवाय शोमध्ये प्रवेश केला होता, पण त्यांच्या बेधडक आणि अनफिल्टर्ड प्रवासाने त्यांना रातोरात आयकॉन बनवलं.

हा बदल घडतो कारण शो कोणत्याही स्क्रिप्टशिवाय चालवला जातो. स्पर्धक बाहेरच्या जगापासून पूर्णपणे तुटलेल्या, कठोर आणि प्रचंड दबावाच्या वातावरणात प्रवेश करतात. तिथे त्यांच्याकडे फोन नसतो आणि आपल्या जवळच्या माणसांशी संपर्कही साधता येत नाही. अशा एकाकी आणि तणावपूर्ण वातावरणात कुणीही जास्त काळ आपला खरा चेहरा लपवून ठेवू शकत नाही. २४ तास कॅमेऱ्यांच्या नजरेखाली खऱ्या भावना, खरे मतभेद आणि नैसर्गिक मैत्री आपोआप समोर येते.

माजी स्पर्धकांनीही अनेकदा या वास्तवाला दुजोरा दिला आहे. इथे ना रीटेक असतात, ना स्क्रिप्ट रायटर्स, ना कृत्रिम अभिनयाला वाव असतो, कारण स्पर्धकांची स्वतःची खरी प्रतिमा आणि प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. कोणताही खोटा अभिनय प्रेक्षक लगेच ओळखतात. दररोज रात्री प्रेक्षकांना जे दिसतं, ते माणसाच्या वागण्याचं खरं रूप असतं - अनस्क्रिप्टेड, अनपेक्षित आणि घरात राहणाऱ्या व्यक्ती तसेच घराबाहेरून पाहणाऱ्या प्रेक्षकांनी मिळून घडवलेलं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ