IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, या १५ खेळाडूंना
वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड समितीने घोषणा केली आहे. या मालिकेला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे.
२०२६ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे भारतीय संघाला या वनडे मालिकेत आपला मुख्य संघ उतरवता आलेला नाही, कारण त्याच काळात आशियाई क्रीडा स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे एकदिवसीय संघातील सहा ते सात प्रमुख खेळाडू या मालिकेतून बाहेर आहेत. या संधीचा फायदा घेत निवड समितीने अनुभवी रवींद्र जडेजासह अनेक खेळाडूंना एकदिवसीय क्रिकेटमध्ये संधी दिली आहे आणि संघात स्थान दिले आहे.
कर्णधार शुभमन गिलसाठी ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही अनुभवी खेळाडूही मैदानावर उतरणार आहेत. आपल्यावर टीका करणाऱ्यांना दमदार कामगिरीने चोख उत्तर देण्यासाठी हे दोघेही प्रयत्नात असतील. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने विकेटकीपर-फलंदाज केएल राहुलकडे एकदिवसीय संघाच्या उपकर्णधारपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
याशिवाय ध्रुव जुरेलला दुसरा विकेटकीपर-फलंदाज म्हणून संघात स्थान मिळाले असून त्याने ऋषभ पंतची जागा घेतली आहे. ऋतुराज गायकवाडलाही संधी देण्यात आली असून तो पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. यशस्वी जैस्वालचेही संघात पुनरागमन झाले आहे. दीर्घ काळानंतर अनुभवी रवींद्र जडेजाला पुन्हा एकदिवसीय संघात स्थान मिळाले असून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही संघात पुनरागमन केले आहे.
नितीश कुमार रेड्डीला मात्र भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातून वगळले आहे. हार्दिक पांड्या अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. दुसरीकडे फिरकी गोलंदाज अष्टपैलू नमन धीरचा संघात समावेश करण्यात आला असून देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याला ही संधी मिळाली आहे. वेगवान गोलंदाज आकिब नबीचाही एकदिवसीय संघात समावेश झाला असून यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या जागी तो कसोटी संघात सामील झाला होता.
वेस्ट इंडिज मालिकेसाठीचा भारताचा एकदिवसीय संघ पुढीलप्रमाणे आहे - शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जायसवाल आणि नमन धीर.